राज्यात मलनिस्सारणाचे सांडपाणी प्रक्रीयेविना सोडल्यास कारवाई – प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम
ठाणे : राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार असून त्याठिकाणी प्रक्रीयेविनाच सांडपाणी वाहीनीतून सोडण्यात येत असेल तर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष…

