डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई :- एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्री सरनाईक म्हणाले,…
महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर राहिल.- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ते ‘ ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन ‘ आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब…
पुनर्विकास प्रकल्पांत मूळ रहिवाशांची घोर फसवणूक आमदार संजय केळकर घेणार एसआरए अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक..
ठाणे :- झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक होते. त्यामुळे महापालिकेने विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एसआरए प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, एसआरए-पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. खोपट येथील भाजपच्या…
“छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” पुस्तकाचे मालवणी महोत्सवात प्रकाशन खाद्य संस्कृतीसोबत साहित्य संस्कृतीचा डंका
ठाणे :- कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात खाद्य संस्कृतीच्या सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचाही दरवळ अनुभवायला मिळाला. मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सामंत – सावंत यांच्या “छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” या बाल साहित्यकृतीचे प्रकाशन उत्साहात पार पडले. बाल साहित्यिका डॉ. सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे…
मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास
ठाणे :- आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी…
वाढते रेल्वे अपघात: राष्ट्रवादी (श.प.) चा रेल्वे प्रशासनाला अल्टीमेटम
गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान परीक्षार्थींसाठी रेल्वेचा एक डबा राखीव ठेवावा शिक्षण खात्याने आगामी काळात परीक्षांच्या वेळा बदलाव्यात ठाणे :- गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी ,…
ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये :ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब – महापौर शर्मिला पिंपळोलकर
7 वर्षीय ठाणेकर जलतरणपटू रेयांश खामकरची लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ठाणे :- ठाण्यातील अवघ्या ७ वर्षांच्या रियांश सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदांत हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली…
ठाण्यात झाडांवर रोषणाई म्हणजे पर्यावरणावर थेट हल्ला!
ठाणे शहरात उत्सव, कार्यक्रम व तथाकथित सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई, वायरिंग व जड साहित्य लावले जात आहे. ही कृती सौंदर्यीकरण नसून झाडांवरील अमानुष हिंसा आहे. झाडे सजावटीचे खांब नाहीत; ती शहराचा श्वास आणि नागरिकांचा प्राणवायू आहेत.या प्रकारामुळे झाडे जखमी होत असून पक्षी, कीटक व जैवविविधता नष्ट होत आहे. एका बाजूला शासन Net Zero…
लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत
ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या प्रत्येक गाण्यामागे एक विचार होता. तो विचार आपण समजून घेतल्यास आपले जीवन समृद्ध होईल, असे मत बहुआयामी गायिका व संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे-जोशी यांनी व्यक्त केले. ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात सलग…
माझा भारत, माझं मत, मी भारत आहे’ठाण्यात १६ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा
‘ ठाणे, : लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘१६ वा राष्ट्रीय मतदार दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. “माझा भारत, माझे मत, मी भारत आहे” या मुख्य संकल्पनेवर आधारित हा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण…

