गृहसंकुलाला सहा महिन्यांत टँकरपोटी दीड कोटींचा भुर्दंड.
. घोडबंदरमधील एका गृहसंकुलाने सहा महिन्यांत लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली. पाणी टंचाईमुळे येथील टँकरलॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी…

