ठाणे काँग्रेस कडून जनसुरक्षा कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावत निदर्शने
ठाणे, 30 जुलै.(प्रतिनिधी): शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरि हक्कांची पायमल्ली होणार आहे, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी…

