जिल्हा परिषद, ठाणे; ई-ऑफिसद्वारे कागदविरहित कामकाजाकडे दमदार वाटचाल

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांमध्ये कागदविरहित कामकाजाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. प्रशासनातील सर्व फाईली ई-ऑफिस प्रणालीद्वारे तयार केल्या जात असून यामुळे कामकाजात पारदर्शकता, गती, तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचे जलद निराकरण प्रभावीपणे होत आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांमध्ये ई-ऑफिस प्रणालीअंतर्गत झालेल्या कामकाजाची प्रगती उल्लेखनीय आहे….

Read More

माजिवडा-लोढा भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार आ. केळकर

आ. केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाचे काम लवकरच.. माजिवडा-लोढा भागातील नाल्यावरील सुमारे २५ वर्षे जुना पुल जीर्ण झाला असून येथील वाढत्या लोकसंख्येनुसार आमदार संजय केळकर यांनी केलेली नवीन पुलाची मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच नवीन पुलाच्या कामास सुरुवात होणार असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बुधवारी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत…

Read More

मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर

! भरत जाधव – महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच…

Read More

ठाण्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा ‘जागर’ संपन्न!

प्रज्ञा पवार, अरुण म्हात्रे यांच्यासह दिग्गज कवींनी उलगडला सुर्व्यांचा जीवनपट ठाणे : ‘कामगार-कवी’ अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या ‘जन्मशताब्दी’निमित्त ठाण्यात शनिवार, दि. २२ नोव्हेंबर-२०२५ रोजी, नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला. ‘कामगार-कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती, ठाणे जिल्हा’ यांच्या वतीने, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील…

Read More

पाचव्या स्मृतिदिनीच जमील शेखच्या पत्नीने राष्ट्रवादी (श.प.) कडे भरला उमेदवारी अर्ज

@ न्यायासाठी आता जनतेच्याच न्यायालयात फिर्याद – खुशनुमा शेख@ खुशनुमा यांना विजयी करून जमील शेख यांना न्याय द्या – मनोज प्रधान ठाणे – राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला आज ( दि. 23) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतिदिनीच खुशनुमा जमील शेख यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडे आपला अर्ज दाखल केला…

Read More

तुळशीराम साळवे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश

दिवसाला 20 पैसे घेऊन मते विकू नका- डाॅ.जितेंद्र आव्हाड कळव्यातील 16 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचेच असणार – मनोज प्रधान ठाणे – कळवा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम साळवे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी,…

Read More

भीमशक्ती आणि शिवशक्ती पुन्हा एकत्र; सत्ता नाही तर न्यायासाठी युती

२५ वर्षांनंतर ठाण्यात इतिहासाची पुनरावृत्ती; शिंदेंनी दिली भीम–शिवशक्ती एकतेची घोषणा आनंदराज बाबासाहेबांचे रक्त, आम्ही विचारांचे भक्त रिपब्लिकन सेनेच्या 11 व्या वर्धापन दिनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना ठाणे, ता. 21 : २५ वर्षांपूर्वी याच ठाण्यात आनंद दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आमची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज…

Read More

बिल्लावर समाजाचा २५ वा रोप्य महोत्सवी समारंभ ठाण्यात संपन्न

समाज एकत्र राहिला तरच समाजाची प्रगती होते “कर्नाटकाची मुळे, महाराष्ट्राचे हृदय – बिल्लावर समाजावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्तुती वर्षाव!” ठाणे, : समाज एक संघ राहिल्यास समाजाची प्रगती आणि उन्नती होते. ज्या ठिकाणी तुम्ही जाता, त्या ठिकाणच्या माती, संस्कृती आणि परंपरेशी तुम्ही एकरूप होत समाजाला पुढे नेत आहात. तशीच आमची शिवसेना आहे, जी सर्व समाजांना सोबत…

Read More

ठाण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडकेंद्रित कारभारा विरोधात ‘अजय जया फाउंडेशन’चे आंदोलन

ठाणे – शहरातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंडकेंद्रित कार्यपद्धती, निष्काळजी व्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या त्रासाविरोधात सामाजिक कार्यकर्ता अजय जया आणि अजय जया फाउंडेशन (AJF) यांनी आज तीन हात नाका सिग्नल येथे प्रभावी आंदोलन छेडले. ठाण्यातील अत्यंत गर्दीच्या आणि वाहतुकीने तुडुंब भरलेल्या या सिग्नलवर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उभे राहत नागरिकांचा आवाज बुलंद केला. या आंदोलनादरम्यान “Citizens deserve service,…

Read More

हेल्मेट वापरासाठी समाजात व्यापक जनजागृती आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप ठाणे,दि.२०(जिमाका)- रस्ते अपघातांत मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमेध व्हिजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय,…

Read More
Back To Top