भाजपा आमदार श्री संजय केळकर व विधानपरिषद सदस्य श्री निरंजन डावखरे यांनी ठाणे मनपा आयुक्तांना दिले दोन ऐतिहासिक विकास प्रस्ताव — यात श्री. संजय केळकर यांनी दिलेल्या भारतातील पहिल्या ‘रंग संग्रहालयाचा’ समावेश

ठाणे :- ठाणे शहराला सांस्कृतिक व नागरी ओळख देणार्या एका महत्त्वाच्या पावलात, मा. आमदार श्री संजय केळकर आणि मा. विधानपरिषद सदस्य श्री निरंजन डावखरे यांनी वरिष्ठ पक्ष पदाधिकारी व स्थानिक प्रतिनिधींसह आज ठाणे मनपा आयुक्त श्री सौरभ राव यांची भेट घेऊन शहराच्या सर्वकष विकासासाठी दोन नाविन्यपूर्ण प्रस्ताव औपचारिकरित्या सादर केले.
हे प्रस्ताव भारत सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड (UCF) अंतर्गत मनपासोबतचा संयुक्त उपक्रम म्हणून सादर करण्यात आले असून, सांस्कृतिक नावीन्यासोबतच ठाण्याचा जिवंत वारसा जपण्याचा याचा उद्देश आहे.
प्रस्ताव १: भारतातील पहिले ‘रंग संग्रहालय’ — एक अनोखा सांस्कृतिक ठेवा
पहिल्या प्रस्तावात ठाण्यात समर्पित रंग संग्रहालय उभारण्याचा दृष्टिकोन आहे — भारतातील पहिले या प्रकारचे संग्रहालय, ज्याची मध्यवर्ती संकल्पना आणि अनुभव हा केवळ “रंग” असेल.
पारंपरिक संग्रहालयांपेक्षा वेगळे असे हे संग्रहालय रंगांचे शास्त्र, तत्त्वज्ञान व भावना या अंगाने रचले जाईल — रंगांचे सिद्धांत, त्यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व, मानसिक परिणाम आणि रंग मानवी जीवन, कला, वास्तुकला व समाजावर कसा प्रभाव टाकतात याचा आवाका यातून घेतला जाईल. सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी अनुभवात्मक, शिक्षणात्मक व इंटरॅक्टीव्ह दालने यात असतील.
या उपक्रमाविषयी बोलताना श्री संजय केळकर म्हणाले:
“ठाणे हे नेहमीच संस्कृती, शिक्षण व नाविन्याचे शहर राहिले आहे. देशातील पहिले रंग संग्रहालय हे ठाण्याला जागतिक सांस्कृतिक नकाशावर नेईलच, शिवाय पिढ्यानपिढ्या शिक्षण, पर्यटन व सर्जनशील प्रेरणेचे केंद्र बनेल. ही शहरासाठी आमची दृष्टी आहे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही जिवापाड प्रयत्न करू.”

प्रस्ताव २: दोन एतिहासिक बाजारपेठांचा पुनर्विकास — शिवाजी भाजी मंडई व महात्मा फुले मार्केट
दुसरा प्रस्ताव हा ठाण्याच्या दोन सर्वात जुन्या व प्रतिष्टित बाजारपेठांच्या पुनर्बांधणी व आधुनिक पुनर्विकासावर केंद्रित आहे, ज्या दोन्ही बाजारपेठा शंभराहुन अधिक वर्षे जुन्या असून शहराच्या जिवंत वारस्याचा अविभाज्य भाग आहेत:
हा दुसरा प्रस्ताव आमदार श्री संजय केळकर व विधानपरिषद सदस्य श्री निरंजन डावखरे यांची संयुक्त दृष्टी म्हणून सादर केला गेला असून, शंभराहून अधिक वर्षे जुन्या व शहराच्या जिवंत वारस्याचा अविभाज्य भाग असलेल्या ठाण्यातील दोन जुन्या व प्रतिष्टित बाजारपेठांचा सर्वकष पुनर्विकास यात प्रस्तावित आहे:
1.महात्मा ज्योतिबा फुले मंडई, लोकप्रिय नाव जांभळी नाका मार्केट, आणि
2.शिवाजी भाजी मंडई, तळावपाळीजवळ स्थित.
या पुनर्विकासाचा उद्देश या एतिहासिक बाजारपेठा अधिक चांगल्या व आधुनिक स्वरूपात पुनर्स्थापित करणे हा असून, पिढ्यानपिढ्या ज्या वापराच्या अनुभवामुळे ह्या बाजारपेठा लोकप्रिय राहिल्या, तो वापराचा अनुभव बदलविला जाणार नाही. नविन बाजारपेठा अधिक सुसंघटित, अधिक आधुनिक, आणि देशातील एकमेवाद्वितीय अशा डिझाईन व संकल्पनेत साकारल्या जातील.
प्रस्तावित पुनर्विकासाची प्रमुख वैशिष्ट्ये:
•शंभर वर्षे जुन्या बाजारपेठांच्या वारसा जपत त्यांना २१ व्या शतकाच्या दर्जाचे करणे.
•ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी समर्पित सुविधांसह पूर्णतः सुलभ असे डिझाईन.
•भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी शीत गोडाउन सुविधा, जेणेकरून नासाडी कमी होईल व उत्पन्नात वाढ होईल.
•तळमजल्यावर आधारित, हवेशीर व खुले रचनात्मक रचना — व्हर्टिकल मॉल-शैलीच्या बाजारपेठांपासून जाणिवपूर्वक फ़ारकत, ज्या भूतकाळात विक्रेते व ग्राहकांसाठी कुपित वाटणारा अनुभव व वापराच्या अनुभवात पूर्ण बदलामुळे वारंवार अपयशी ठरल्या.
•सजावटीचे खुले चौक, बसण्याची व्यवस्था व पायी चालणार्यांसाठी अनुकूल जागा, ज्या पारंपरिक भारतीय बाजाराच्या जिवंत, चालत-चालत अनुभवाचा घटक जपून ठेवतील.
•एकूणच एक नवीन वापराचा अनुभव जो तळमजल्यावरील खरेदीच्या जुन्या सुसह्यतेशी जुळून राहील, जेणेकरून विक्रेते व ग्राहकांना नविन जागेतही घरचासारखा अनुभव येईल.
एका संयुक्त निवेदनात श्री संजय केळकर आणि श्री निरंजन डावखरे म्हणाले:
“शिवाजी भाजी मंडई आणि महात्मा फुले मार्केट या नुसत्या व्यापारी जागा नाहीत — त्या ठाण्याच्या आत्म्याचा भाग आहेत, पिढ्यानपिढ्याच्या दैनंदिन जीवनात विणल्या गेलेल्या आहेत. हा प्रस्ताव हा शहरासाठी आमची संयुक्त दृष्टी आहे, आणि आम्ही दोघे मिळून हे स्वप्नवत प्रकल्प ठाण्यासाठी साकार करण्यासाठी शक्य त्या सर्व प्रयत्नांनी काम करू. विकासाने वारस्याचा आदर केला पाहिजे, आणि जोच अर्बन चॅलेंज फंडा अंतर्गतच्या या संयुक्त उपक्रमाचा मार्गदर्शक आत्मा आहे.”
आयुक्तांचा प्रतिसाद
मा. मनपा आयुक्त श्री सौरभ राव यांनी दोन्ही प्रस्तावांचे कौतुक केले आणि शिष्टमंडळाला आश्वासन दिले की ठाणे मनपा अर्बन चॅलेंज फंड चौकटीखाली केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी हे प्रस्ताव तात्काळ हाती घेईल.
येणार्या दिवसांत हाती घेण्यात येणारे इतर जनहिताचे प्रश्न
दोन्ही नेत्यांनी माहिती दिली की त्यांनी आयुक्तांसोबत AMRUT 1.0 व AMRUT 2.0 (अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) योजनांअंतर्गतच्या कामांची प्रगती व विकास, तसेच ठाण्यातील नागरिकांना भेडसावणार्या पाणीसंबंधित समस्या यांची चर्चा केली. त्यांनी हे स्पष्ट केले की हे प्रश्न येणार्या दिवसांत नागरी प्रशासनासोबत संयुक्तपणे हाती घेतले जातील, जनतेला ठोस दिलासा देण्याच्या एकमेव उद्देशाने.

जारीकर्ते:
मा. आमदार श्री संजय केळकर यांचे कार्यालय (148, ठाणे शहर)
आणि
मा. विधानपरिषद सदस्य श्री निरंजन डावखरे यांचे कार्यालय (कोकण पदवीधर मतदारसंघ, महाराष्ट्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top