उन्हाळ्यात लिंबू सरबत, लिंबू शिकंजी सारख्या पेय द्रव्यालाही लिंबू दरवाढीचा फटका..

उन्हाळ्यात लिंबूला दरवाढीमुळे सामान्य नागरिक बेहाल..

ठाणे :- ठाण्यात उन्हाळी तापमानात वाढ होत असल्याने लिंबू, लिंबू सरबत, लिंबू शिकंजी रसाच्या मागणीच्या प्रमाणात वाढ. मात्र या उन्हाळीमुळे कमी दरातील लिंबू जे सामन्यांच्या घश्याची तहान भागवत होते. सध्या महागाईच्या सावळीत गगनाला भिडलेल्या दरात विक्री केली जात आहे. त्‍यात आवक कमी होत असल्‍याने एरवी 10 ते 15 रुपयाला मिळणारा लिंबू किरकोळ बाजारात २० रुपये दराने मिळत आहे. महिनाभरापासून घाऊक बाजारात लिंबाची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर वाढीचा सामना सामन्यांना करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यात ठाण्यातील किरकोळ बाजारात लिंबू 10 ते 15 रुपयांनी विकला जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी होत आहे. त्यात उन्हामुळे लिंबाची मागणी वाढली असून लिंबाच्या दरात वाढ होऊन 20 रुपयांचा झाले आहे. तसेच लिंबू उत्‍पन्नावर दरवाढीचा मोठा परिणाम झाल्‍याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या लिंबूची किंमत
२० चे 4 ( छोटे आकाराचे लिंबू)
२० चे 3 ( मोठे आकाराचे लिंबू)

उन्हाळ्यात लिंबू सरबत, लिंबू शिकंजी सारख्या पेय द्रव्यालाही लिंबू दरवाढीचा फटका..

   लिंबू महागल्याने सामान्यांच्या घश्याची तहान भागवणारे पेय द्रव्य जसे की लिंबू सरबत, लिंबू शिकंजी, उसाचे सरबत, इत्यादी सरबतांच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात या दरवाढीच्या फाटक्यामुळे सामान्य नागरिक बेहाल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top